वैवाहिक वादांमध्ये दोन महिने अटक करता येणार नाही | SUPREME COURT

Share Now

Last updated on July 24th, 2025 at 02:39 pm

नवी दिल्ली, २२ जुलै २०२५ – भारतीय दंड संहितेतील ‘४९८-अ’ कलमाचा गैरवापर रोखण्यासाठी आणि वैवाहिक वादांमध्ये पती व पत्नी दोघांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. कलम ‘४९८-अ’ अन्वये गुन्हा दाखल केलेल्या प्रकरणांत अटक करण्यापूर्वी दोन महिन्यांचा ‘कूलिंग-ऑफ कालावधी’ अनिवार्य करण्यात आला आहे. म्हणजेच अशा गुन्ह्यात दोन महिन्यांमध्ये अटक करण्यास न्यायालयाने मनाई केली आहे. शिवांगी बन्सल विरुद्ध साहिब बन्सल (२०२३ ची हस्तांतरण याचिका (सी) क्रमांक २३६७) या प्रकरणात न्यायालयाने हा निकाल दिला आहे. 

पत्नीने भादंवि कलम ४९८-अ अंतर्गत फाैजदारी खटला दाखल केल्यानंतर तिचा पती आणि त्याच्या वडिलांना अनेक महिने तुरुंगात घालवावे लागले. पतीला १०९ दिवस आणि त्याच्या वडिलांना १०३ दिवसांचा तुरुंगवास भोगावा लागला. हे प्रकरण सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे २२ जुलै २०२५ रोजी सुनावणीला आले होते. 

खंडपीठाने महिलेच्या खोट्या फाैजदारी तक्रारीमुळे पती व त्याच्या वडिलांना नाहक तुरुंगवास भोगावा लागल्याच्या वस्तुस्थितीची गंभीर दखल घेतली आणि दोन महिने अटकेला मनाई करणाऱ्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांना मान्यता दिली. खोट्या तक्रारीमुळे पती व त्याच्या वडिलांना जे भोगावे लागले आहे, त्याची कोणत्याही प्रकारे भरपाई देता येणार नाही, असे न्यायालयाने नमूद केले आणि तक्रारदार आयपीएस अधिकारी महिलेला बिनशर्त जाहीर माफी मागण्यास सांगितले.





Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *